मराठा-धनगरांना संपवण्याचे काम फडणवीसांनी केले – मनोज जरांगे पाटील

- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

0

मराठा-धनगरांना संपवण्याचे काम फडणवीसांनी केले

– मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

जालना : सत्ता मिळवण्यासाठी रॅली काढणाऱ्या फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावी. रॅली काढायचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. कारण आरक्षण दिलं नाही तर सत्ता मिळतच नसते. मराठा-धनगर समाज राज्यात मोठे आहेत. या दोघांना संपवण्याचं काम फडणवीसांनी केल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

यावेळी जरांगे म्हणाले की, राज्यात एक संपवा संपवी खातं निघालं पाहिजे आणि ते खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं पाहिजे. या मंत्री पदासाठी फडणवीस योग्य असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मराठा संपवला, मुस्लिम संपवला, धनगर संपवला, मोठ्या जाती संपवण्याचे काम त्यांनी केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. पाच वर्ष काम केलं नाही फक्त फोडाफोडी केल्याची टीका जरांगे पाटलांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देतील पण, त्यांना फडणवीस आरक्षण देऊ देत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. अजित पवार तर बोलतच नसल्याचे जरांगे म्हणाले.

अशोक चव्हाण असतील, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सगळे मुख्यमंत्री माझ्या विरोधात झाल्याचे जरांगे पाटील म्हणाले. माझा असा अंदाज आहे की फडणवीस जाणून बुजून आरक्षण मिळू देत नाहीत. फडणवीस आरक्षण देऊ देत नाहीत, त्याची फळ त्यांना भोगावी लागतील. मला सरकारकडून अपेक्षा नाही. कारण त्याचं ठरलं आहे, आरक्षण द्यायचे नाही. त्यांना मराठा ओबीसी यांच्यात भांडण लावायची आहेत. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. त्यांनी सरळ सरळ फसवा फसवी केली असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

तुमचा विषय संपला

सरकारनं मराठ्यांना सांगितलं पाहिजे की, तुम्ही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार आहेत की नाहीत? निवडणुकीच्या आत आरक्षण दिलं तर ठिक नाहीतर तुमचा विषय संपला, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.